<?xml version='1.0' encoding='UTF-8'?><?xml-stylesheet href="http://www.blogger.com/styles/atom.css" type="text/css"?><feed xmlns='http://www.w3.org/2005/Atom' xmlns:openSearch='http://a9.com/-/spec/opensearchrss/1.0/' xmlns:georss='http://www.georss.org/georss' xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'><id>tag:blogger.com,1999:blog-6384334779849098020</id><updated>2012-01-19T07:39:58.900-08:00</updated><category term='कथा२'/><category term='कथा४'/><category term='कथा१'/><category term='कथा३'/><title type='text'>Bhinn</title><subtitle type='html'></subtitle><link rel='http://schemas.google.com/g/2005#feed' type='application/atom+xml' href='http://bhinn.blogspot.com/feeds/posts/default'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6384334779849098020/posts/default?max-results=100'/><link rel='alternate' type='text/html' href='http://bhinn.blogspot.com/'/><link rel='hub' href='http://pubsubhubbub.appspot.com/'/><author><name>kavita mahajan</name><uri>http://www.blogger.com/profile/16591743012412093153</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='21' src='http://1.bp.blogspot.com/_VOqp55NrS1U/SxAfP-tj-JI/AAAAAAAAAAw/1Ul3tR5jyzM/S220/kavita+Mahajan.JPG'/></author><generator version='7.00' uri='http://www.blogger.com'>Blogger</generator><openSearch:totalResults>7</openSearch:totalResults><openSearch:startIndex>1</openSearch:startIndex><openSearch:itemsPerPage>100</openSearch:itemsPerPage><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6384334779849098020.post-4361922479634323896</id><published>2011-12-18T08:33:00.001-08:00</published><updated>2011-12-18T08:33:44.571-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कथा४'/><title type='text'>बॉम्बस्फोटानंतर नेहमीप्रमाणे</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;बॉम्बस्फोटानंतर नेहमीप्रमाणे रस्त्यावर रक्तामांसाचा काला झाला होता.  त्यात लोखंड, पोलाद, काचा, वायर्स इत्यादींचे तुकडे यांची भर होती. चौकातील  एका रस्त्यावर बॉम्ब फुटला होता, तरी सगळेच रस्ते वाहतुकीसाठी तात्पुरते  बंद करून टाकले होते. इतक्या सगळ्या भारतीय-अभारतीय, देशी-विदेशी न्यूज  चॅनल्सवरून पुन:पुन्हा तेच दृश्य दाखवत होते, तरी घटनास्थळी बघ्यांची भरपूर  गर्दी ओसंडून वाहत होती. मेलेल्या माणसांचं आणि मरणाऱ्या माणसांचं लाइव्ह  दृश्य प्रत्यक्ष बघायला माणसांना आवडत असतं. त्यामुळे तर मागे शिल्लक  राहिलेल्या माणसांच्या जीवनात नाटय़ येतं.&lt;br /&gt;प्रेतांच्या त्या ढिगाऱ्यातलं एक प्रेत हलतंय, असा बघ्यांच्या गर्दीतल्या  एका बघ्याला नेहमीप्रमाणे भास झाला. माणूस आपला असो वा परका असो, मित्र असो  वा शत्रू असो, तो मेलाय याची पुन:पुन्हा नीट आणि नेटाने खात्री करून घेणं,  हे जिवंत माणसाचं कर्तव्य असतं. त्यामुळे अगदी डॉक्टरांनी माणूस मेलाय असं  सांगितलं तरी माणसांना जुन्यापान्या कुठकुठल्या ऐकीव हकिकती आठवायला  लागतात. ‘अग्गो, तिरडीला बांधल्यावर लक्षात आलं की म्हातारीचा श्वास सुरूच  होता.’ ‘अरे, त्या तमक्याचा बाप.. मी रजा टाकून अंत्यसंस्काराला गेलो  होतो.. तर तो चितेवर उठून बसला ताडकन. छातीवरचं लाकूड असं, अगदी असं एका  बोटानं बाजूला सरकवलं आणि हातात अग्नी द्यायला पेटतं लाकूड धरलेल्या  पोरामागे शिव्या घालत स्मशानातच धावत सुटला. माझी रजा वाया गेली आणि त्या  पोराचा लाकडांचा खर्च! काय महाग झालीत आजकाल लाकडं म्हणून सांगू..!’ तर या  अशा कथा-दंतकथा आठवू लागल्या की माणूस जिवंत असल्याची शक्यता समुहात  धुगधुगी आणते. पण इथं गोष्ट निराळी होती. पोलिसांनी बघ्यांना पांगवायला  सुरुवात केली आणि तेवढय़ात धुवांधार पाऊस सुरू झाला. तोवर शववाहिनीही आली.&lt;br /&gt;&amp;nbsp;शासकीय  रुग्णालयात आधीच तुफ्फान गर्दी होती. खासगी रुग्णालयं आता डॉक्टरांना  परवडत नव्हती. शवागारही नेहमीसारखंच खच्चून भरलेलं होतं. अखेर ही नवीनवेली  प्रेतं तात्पुरती व्हरांडय़ातच ठेवावीत, असा निर्णय झाला. प्रेतांची ओळखपरेड  सुरू झाली. माणसं आपलं आपलं प्रेत ओळखून इथून लवकरात लवकर घेऊन जातील  तितकंच बरं होतं. खिसे, पाकीट, पर्सबिर्स शोधून काही प्रेतांचे पत्ते  लागले. टीव्हीवर नावांच्या याद्या दाखवल्या जाऊ लागल्या. जखमींच्या वेगळय़ा,  मृतांच्या वेगळ्या आणि निनावींचा आकडा अमुक.&lt;br /&gt;रुग्णालयात आधी नगरसेवक  आले. मग आमदार आले. मग विरोधी पक्षाचे लोक आले. त्यांच्यासोबत नेहमीप्रमाणे  पुष्कळ कार्यकर्ते होते. जखमींना आणि प्रेतांना बघण्याची सगळय़ांना  उत्सुकता होती. बघून झाल्यावर टीव्ही चॅनलवाल्यांना तसं रीतसर शालीनपणाने  सांगून ते परतत होते. कोणत्याही पक्षाचे असले तरी सगळ्यांमध्ये एक साम्य  होतं.. त्या सगळय़ाच बिचाऱ्यांचं फक्त तोंड उघडं होतं आणि त्यांचे खिसे  फुगीर असले तरी शिवलेले होते.&lt;br /&gt;पोलीस कंट्रोल रूममध्ये मुख्यमंत्री  पोहोचले. इथून जनतेला काय संदेश द्यायचा आहे, हे त्यांना माहीत होतं. खरं  तर प्रत्येक बॉम्बस्फोटाच्या वेळी वेगळा-वेगळा मुख्यमंत्री होता. पण भाषेचा  वेग राजकीय घडामोडींच्या तुलनेत केव्हाही कमी असतोच. नवे नेते जितक्या  झटपट येतात, तितक्या गतीने नवे शब्द निर्माण कसे होणार? आणि हे नवनिर्माण  नेमकं कशाकरता? काय उपयोग त्याचा? तर इकडे मुख्यमंत्र्यांनी संदेश देण्याची  तयारी सुरू केली आणि तिकडे रुग्णालयात नवल घडलं!&lt;br /&gt;व्हरांडय़ातून जाणाऱ्या  एका नवोदित डॉक्टरनं दचकून सांगितलं की, ज्याचं हृदय आणि मेंदू मृत  झाल्याचा निष्कर्ष काढून डेथ सर्टिफिकेट लिहून&amp;nbsp; झालं आहे, असं एक प्रेत  एकाएकी बोलायला लागलं आहे! आता ही ब्रेकिंग न्यूज म्हणावी की, मुख्यमंत्री  संदेश देताहेत ही ब्रेक्रिंग न्यूज म्हणावी, याबाबत चॅनलवाल्याचा खल सुरू  झाला. अखेर दोन एक्स्क्लुझिव्ह ब्रेकिंग न्यूज म्हणत पट्टय़ा झळकू लागल्या.  तेवढय़ात ध्यानात आलं, की व्हरांडय़ातल्या प्रेताचं बोलणं कुणालाच नीट ऐकू  येत नव्हतं. प्रेत अत्यंत हळुवार आवाजात कुजबुजल्या स्वरात काहीतरी सांगत  होतं. त्याच्या डोक्याचा कलिंगड फुटावं तसा चिखल झाला होता. त्याचे नाक,  डोळे, कान, ओठ, दात, जीभ काहीही लगद्यातून वेगळं दिसत नव्हतं. त्याच्या  देहात कुठेही काही हालचाल नव्हती. तरी त्याच्यातून त्याचा आवाज मात्र बाहेर  पडत होता.&lt;br /&gt;त्याच्याजवळ कुठे कपडय़ात, शरीरात एखादा मोबाइल फोन राहून  गेलाय का, या शक्यतेची तातडीने तपासणी करून झाली. पण त्याचे खिसे  नेहमीप्रमाणे रिकामे होते. त्यात कुठलं तिकीट नव्हतं, पास नव्हता, बिल  नव्हतं, कविता नव्हती, पत्र नव्हतं, अर्ज नव्हता. बॉम्बस्फोटानंतर कुणा  गरजू भुरटय़ा चोरानं त्याच्या खिशातून सराईतपणे काही लंपास केलंय, अशी  शक्यताही नव्हती. कारण बॉम्बस्फोटाच्या या खेपेला काही काही प्रेतांजवळ  त्यांच्या काहीबाही गोष्टी सापडल्या होत्या. खूप मोठं असं मधमाश्यांचं  मोहोळ घोंघावत उठावं, तसा प्रेताच्या बोलण्याचा आवाज ऐकू येत होता. त्याचे  शब्द नीट आणि नेमके समजावेत म्हणून जखमींनी कण्हणं थांबवलं. नातलगांनी  आक्रोश थांबवला. कार्यकर्त्यांनी टीव्ही बाइट्स देणं थांबवलं. सगळ्यांचे  मोबाइल स्वीच ऑफ करण्यात आले. हे सगळं कुणी कुठला आदेश न देता आपोआप झालं,  कारण लाल चिखलातून&amp;nbsp; येणारा आवाज ऐकूनच सगळे अवाक्&amp;nbsp; झाले होते. कुणा धीट  चॅनलवाल्यानं पुढाकार घेऊन एक माइक प्रेताला अ‍ॅडजेस्ट करून लावला. त्याचा  चेहरा उदात्त आणि कृतकृत्य बनला. आता प्रेताचं बोलणं सगळ्यांना ऐकू आलं  असतं. इतकी गडदगर्द शांतता त्या रुग्णालयालाच काय, पण त्या महानगरालाही  कधीच माहीत नव्हती.&lt;br /&gt;वातावरणातला ताण वाढला आणि त्याचा परिणाम काही  अतिसंवेदनशील मनांवर झाला. एक चॅनल सर्फिग करत टीव्ही बघत होता. ही दृश्ये  रक्तदाब वा हृदयविकार वा मनोविकार असणाऱ्या माणसांनी पाहू नयेत, अशी पाटी  टीव्हीवर नेहमीप्रमाणे झळकत होती. आता वासही येईल असे नवे फोर डी टीव्ही  आले आहेत, तसा टीव्ही लवकर घरी आणला पाहिजे. म्हणजे पुढच्या  बॉम्बस्फोटाच्या वेळी नुसता लाल चिखल पाहताना जळका-भाजका-करपता वासही येईल,  असं एकाला वाटलं. हा विचार त्याच्या मनात आल्यापाठोपाठ तमाम न्यूज  चॅनल्सवर प्रेत बोलायला लागल्याच्या बातमीची पट्टी झळकायला लागली. ते पाहून  एक दचकला. या बोलायला लागलेल्या प्रेताची अजून ओळख पटली नव्हती. ते जर  नेमकं आपल्यातलंच कुणी निघालं आणि त्याला मेल्यावर माफीचा साक्षीदार बनावं  असं वाटलं असेल तर ते काय-काय बोलेल? प्रेत स्वत: निनावी असलं तरी दोषी  म्हणून कुणाकुणाची नावं घेईल? एकाचा चेहरा या कल्पनेच्या भयानं आणि काळजीनं  आणि वैतागानं वेडावाकडा झाला. त्यानं प्रयत्नपूर्वक आपल्या चेहऱ्याच्या  रेषा पूर्ववत केल्या आणि दोनला-तीनला-चार-पाच-सहाला फोन लावले. त्यांनी  सतरा नव्याण्णव एकशे अठ्ठावीसना फोन करायला सुरुवात केली. अकराव्याने  विचारलं की, प्रेत कोणत्या भाषेत बोलतेय. एक म्हणाला की, काही कळत नाहीये,  पण त्याची भाषा मात्र सगळ्यांनाच कळतेय आणि हे फारच काळजी करण्याजोगे आहे.  सारे ऐकून सगळ्यांचे चेहरे अनुक्रमे वेडेवाकडे आणि पुन्हा सरळ झाले.&lt;br /&gt;प्रेताचा  माईक अ‍ॅडजेस्ट होत होता तोवर पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री भेटीसाठी  येणार हे समजलं. यंत्रणा नेहमीप्रमाणे हलायला लागल्या. मुख्यमंत्री  टीव्हीवर संदेश देण्यासाठी जाकीट घालून बसले. एक पोलीस त्यांच्या जाकिटाकडे  एकटक पाहत होता. राज्याच्या गृहमंत्र्यांनी ते पाहून मान वळवली.  मुख्यमंत्र्यांनी बोलायला सुरुवात केली, पण आजचा दिवसच अघटिताचा होता.  मुख्यमंत्र्यांचे ओठ वेगळे शब्द उच्चारत होते आणि टीव्हीवर डबिंगमध्ये  घोटाळा व्हावा तसे वेगळेच ऐकू येत होते.&lt;br /&gt;संदेशात मुख्यमंत्री म्हणाले  की, वास्तवावर विश्वास ठेवू नका आणि अफवांकडे नीट लक्ष पुरवा.&amp;nbsp;  नेहमीप्रमाणे शांत न राहता घराबाहेर पडा. हीच वेळ आहे, हाच तो क्षण आहे,  जेव्हा तुम्ही आपली अस्वस्थता व्यक्त करू शकाल. अफवांची टोपी घाला,  अफवांच्या चपला घाला. अफवांचा रेनकोट आणि अफवांचा चष्मा घाला. लोकलमधून,  बसमधून, टॅक्सीमधून या. नवे शक्तिशाली बॉम्ब थांबले आहेत, टायमर लावून  तुमच्यासाठी फुटण्याची वाट पाहत. संधी गमावू नका. बोलता बोलता  मुख्यमंत्र्यांना इयरफोनमधून हे शब्द ऐकू येऊ लागले, जे त्यांनी उच्चारलेच  नव्हते. गडबडून त्यांनी तोंडावर हात घट्ट दाबून ठेवला. उपमुख्यमंत्र्यांनी  बिचकून त्यांचा दुसरा हात आपल्या हातात घट्ट धरून ठेवला, हात सुटणं त्यांना  कधीच परवडणारं नव्हतं.&lt;br /&gt;इकडे प्रेताला शरीराच्या चिखलातही शब्द टोचत  होते. अंगात घुसलेल्या खिळे-पत्रे-काचांसारखी या शब्दांना धार नव्हती. तरी  शब्द सळसळत होते. नवोदित डॉक्टरने वाकून प्रेताला विचारलं, तुम्हाला काही  हवंय का? काय हवंय?&lt;br /&gt;प्रेताचा आवाज कोमल होता. ते पुन:पुन्हा तेच तेच  शब्द उच्चारत होते.. गवत.. नदी.. लगोरी.. मुलासाठी आपल्या इतिहासाचं  पुस्तक.. त्रेपन्नावा पत्ता.. चिमण्या.. श्वास..&lt;br /&gt;नवोदित डॉक्टर मनातच  म्हणाला, सगळय़ांना याचंही विस्मरण होईल. पण याच्या मुलाला इतिहासाचं नवं  पुस्तक मिळो. सगळय़ा घरांना अंगण असो. अंगणात चिमण्या येवोत. ओल्या जखमांवर  नव्या जखमांचं कलम केलं जाऊ नये. प्रत्येकाला असा, तसा किंवा कसाही श्वास  घेता यावा. जिवंत आहोत तोवर शांत राहता यावं. नदीसारखं प्रवाही आयुष्य जगता  यावं.&lt;br /&gt;एकाने ऐकून&amp;nbsp; हुश्श केलं. दोनला-तीनला-चार-पाच-सहाला फोन लावले.  त्यांनी सतरा नव्याण्णव एकशे अठ्ठावीसना फोन करायला सुरुवात केली.  सगळ्यांनी हुश्श केलं. अकरावा एकाला म्हणाला, आता काळजी करायचं काही कारण  नाही.&lt;br /&gt;श्वासाविषयी बोलून प्रेत गप्प झालं होतं.&lt;br /&gt;हे जे घडलं ते मात्र नेहमीप्रमाणं नव्हतं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="" name="JOSC_TOP"&gt;&lt;/a&gt;  &lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6384334779849098020-4361922479634323896?l=bhinn.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://bhinn.blogspot.com/feeds/4361922479634323896/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://bhinn.blogspot.com/2011/12/blog-post_8361.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6384334779849098020/posts/default/4361922479634323896'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6384334779849098020/posts/default/4361922479634323896'/><link rel='alternate' type='text/html' href='http://bhinn.blogspot.com/2011/12/blog-post_8361.html' title='बॉम्बस्फोटानंतर नेहमीप्रमाणे'/><author><name>kavita mahajan</name><uri>http://www.blogger.com/profile/16591743012412093153</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='21' src='http://1.bp.blogspot.com/_VOqp55NrS1U/SxAfP-tj-JI/AAAAAAAAAAw/1Ul3tR5jyzM/S220/kavita+Mahajan.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6384334779849098020.post-2485464709788463475</id><published>2011-12-18T08:26:00.000-08:00</published><updated>2011-12-18T08:26:31.372-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कथा३'/><title type='text'>शेजारधर्म</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;रमा दिवसभर झोपून राहिली. सकाळी पंधरा मिनिटं नळाला पाणी यायचं. तेही उठून  भरून ठेवलं नाही. दात घासले नाही. घर झाडलं नाही. आंघोळ केली नाही. नुसतीच  उठली आणि मग पुन्हा झोपून गेली. सकाळी दोनवेळा डोअरबेल वाजली. तिनं  डोक्यावरचं पांघरूण सरकवलं नाही. दुपारी पुन्हा एकदा डोअरबेल वाजली. तेव्हा  तिने नुसती कुस बदलली. तिची झोप पूर्ण होतच नव्हती. मग मोबाईलवर गाणं वाजू  लागलं. ‘डीके बोस डीके बोस’ हे शब्द घोगऱ्या आवाजात घाईघाईने उच्चारल्याने  ‘भोसडीके भोसडीके’ असे ऐकू येत होते. कुणाचा तरी फोन आला होता. उठून बसत  तिनं चष्मा घातला आणि स्क्रीनवरचं नाव वाचलं. गाणं संपलं. शिव्या संपल्या.  फोन संपला. रमानं फोन घेतला नाही. तिला भीती वाटत होती.&lt;br /&gt;खरं तर रमा आजवरच्या आयुष्यात अनेक संकटांना खंबीरपणे  सामोरी गेलेली होती. इतरांनाही तिनं त्यांच्या संकटवेळी मदत केली होती. कधी  आíथक अडचणी, कधी आजारपण, कधी कुणाचा मृत्यू असं प्रत्येकाच्याच आयुष्यात  काही ना काही सुरूच असतं. माणसांनी नाही माणसांसाठी धावून जायचं, उपयोगी  पडायचं, तर माणसांचं निभेल तरी कसं? असं तिला मनापासून वाटायचं. तिच्या  आजूबाजूच्या लोकांनाही तसंच वाटायचं.&lt;br /&gt;आता गेल्या बॉम्बस्फोटात तिच्या समोरच्या इमारतीतला  एकजण मेला. त्याचं नुसतं धड सापडलं होतं. डोकं गायब झालं होतं. हातातल्या  बोटाच्या अंगठीवरून त्याची ओळख पटवून मिळालं ते शरीर घरी आणलं. त्यावेळी  त्याच्या आईवडिलांना, सासूसासऱ्यांना गावी कळवणं, रडणाऱ्या बायकोचं सांत्वन  करणं, सुतकात घरी स्वयंपाक केला जाणार नव्हता तर पिठलंभात रांधून देणं, हे  सगळं तर कॉलनीतल्या लोकांनी केलंच. पण पोस्टमार्टेमनंतर बॉडी देत नव्हते,  तर हजार-पाचशेंची वर्गणी काढून तब्बल तेवीस हजार रुपये मोजून ते मेलेले  तुकडे आणले. नंतरच्या दंगलीच्या वेळी मेलेल्या तरुण मुलाच्या वेळी तर  पोलिसांना, डॉक्टरांना आणि स्मशानातही पसे द्यावे लागले होते. तेव्हाही  वर्गणी काढली होती. अखेर शेजारधर्म निभवावा लागणारच ना.&lt;br /&gt;पूर्वी शेजारधर्म निभवणं थोडं सोपं होतं. वाटीभर साखर  वा कपभर दूध वेळेवर उसनं आणलं जायचं. घरात गोडधोड रांधलं तर शेजारच्या दोन  घरांत दिलं जायचं. कुणाचा पोरगा दहावीला आहे, तर कुणी ना कुणी त्याला  परीक्षा केंद्रावर सोडायला जायचं. कुणी आजारी असेल तर दवाखान्यात थांबायला,  निदान बघायला जायचं. कुणा बेकाराला नोकरी मिळावी म्हणून शब्द टाकला जायचा.&lt;br /&gt;पण मग हळूहळू हवाच बदलत गेली, त्याला माणूस तरी काय  करणार? चोवीस तास पाणी मिळायचं तर आठ तास तीन तास होत पंधरा मिनिटांवर आलं.  विभागातले तीन मॉल धडाधड बंद पडले. वाणसामानाची सात लहान दुकाने होती,  त्यातली दोनच शिल्लक होती. बरेच भाजीवाले, फळवाले रांगेत फूटपाथवर बसत, ते  सगळे अदृश्य झाले. दूधवाल्यांची संख्या रोडावली. बागेतली झाडं सुकून गेली.  मुलं खेळायला येण्याची बंद झाली. बायका संध्याकाळी घोळक्याने गप्पा मारताना  दिसत, त्या घरातच राहू लागल्या. रस्त्यावरील भटकी कुत्री, कॉलनीत  इकडेतिकडे फिरणारी मांजरं दिसेनाशी झाली. घरात साधे कोळी घर बांधेनासे  झाले. पाली, झुरळं, उंदीर न जाणे कुठे गायब झाले.&lt;br /&gt;नाही म्हणायला रमाला एक दिवस एक मोठे गुबगुबीत मांजर  खिडकीतून अचानक दिसले. त्याचे तोंड जरा विचित्रच होते. डोळेही बारीक होते.  शेपटी तर चक्क उंदरासारखी होती. ते क्षणार्धात दिसेनासे झाले. त्यामुळे ते  मांजर नसून उंदीर होता की काय असे तिला वाटून गेले. पण इतक्या मोठय़ा  आकाराचा उंदीर तिच्या कल्पनेपलीकडे होता.&lt;br /&gt;लोक तर उंदीर गायब झाल्याचं ठामपणे सांगत होते.  चिमण्या, गिधाडं, वाघ यांच्यापाठोपाठ उंदरांच्या नाहिसे होण्याची बातमीही  वृत्तपत्रांनी ठळक छापली होती. शहरातच नव्हे तर खेडय़ांत शेतकरीही तेच सांगत  होते. शेतांमध्ये उंदरांची किती मोठी बिळं सापडत आणि त्यातून प्रसंगी  चार-चार पायल्या धान्य वा दोन-दोन पोती भुईमुगाच्या शेंगा कशा निघत, हे  सांगून उंदीर आता फक्त गणेशमूर्तीत दिसतात असं एक शेतकरी म्हणाला होता.  अन्नधान्याचं वाढतं संकट पाहता ही शक्यता नाकारण्याजोगी नव्हतीच.&lt;br /&gt;अविश्वसनीय काही राहिलंच नव्हतं. शेकडो शेतकऱ्यांनी  आत्महत्या केल्या होत्या. कधी अवर्षण कधी अतिवृष्टी यांनी लोक गांजले होते.  दूध, भाजीपाला, डाळींचे भाव आकाशाला भिडले होते. पदार्थाना पूर्वीची चव  राहिली नव्हती. नाणी चलनातून रद्द होऊ लागली होती. मोठमोठय़ा आकडय़ांच्या  नोटा येत होत्या. एकेदिवशी शंभर रुपयांची नोट मोडून रमाने दोन केळी आणली  आणि ती खाताना तिला सतत आपण शंभरची नोट खातो आहोत असा भास होऊ लागला.  तेव्हापासून कोणत्याही पदार्थाची चव तिला एकसारखीच लागू लागली.. नोटेच्या  कागदाची चव! तेव्हापासून तिला खूप भूक लागू लागली किंवा लागत असलेली  नेहमीएवढीच भूक खूप मोठी वाटू लागली. तरीही ती सगळं धीराने घेत होती.&lt;br /&gt;मग एका रात्री तिला एक स्वप्न पडलं. स्वप्नात ती  घरातला प्रत्येक डबा उघडून पाहत होती आणि प्रत्येक डबा रिकामा होता. घरात  खाण्यासाठी अन्नाचा एक दाणाही शिल्लक नव्हता. शेजारीपाजारीही हीच स्थिती  होती. ती रस्त्यावर उतरून आली तर रस्त्यावरून तिच्यासारखेच हजारो-लाखो  लोकांचे जथे मुलाबाळांसकट अन्नाच्या शोधात दिशाहीन इतस्तत: फिरत होते.  चालताना मध्येच मरून पडलेल्या लोकांची प्रेतं रस्त्याच्या कडेला रचून ठेवली  जात होती. हे स्वप्न मग तिला जवळपास रोजच दिसू लागलं. तरी ती घाबरली नाही.&lt;br /&gt;वर्तमानपत्रांत, टीव्हीवर जोरदार चर्चा सुरू झाली की  सरकारी गोडाऊनमध्ये हजारो टन धान्याचा साठा कुजतो आहे. धान्याचे न्याय्य  वाटप करण्यात सरकार अयशस्वी ठरलं आहे. भूकबळी जाताहेत. मुलं कुपोषणानं  मरताहेत.&lt;br /&gt;मोफत आहार योजनांमधला भ्रष्टाचार कमालीचा वाढला  आहे. शंभरातला एक रुपयाही आता लोकांपर्यंत पोचेनासा झाला आहे. या  बातम्यांनी असंतोष वाढत गेला. अखेर लोक गोदामांवर चाल करून गेले. गोदामं  फोडण्यात आली. पण आत नुसती रिकामी पोती होती. चांगल्या वा कुजलेल्यातरी  धान्याचा एकही कण कुठे नव्हता. एवढय़ा कडेकोट बंदोबस्तातून असं रातोरात  धान्य गेलं कुठे? मीडियाच्या लोकांनाही काहीही उलगडत नव्हतं. ज्याने लाच  खाऊन बातमी दिली तो खबऱ्या चौकीदारही हैराण झाला होता. कुजलेल्या  धान्याच्या वासाने तो गेले काही दिवस त्रासलेला होता आणि आता हवा इतकी  बदलली होती की वास येईनासा झाला आणि मग उजेडही फितूर झाला की धान्यही  दिसेनासे झाले. ते ग्लोबल वॉìमग की काय म्हणतात त्याने इतका बदल होतो?&lt;br /&gt;विरोधी पक्षांनी सरकारला रिकाम्या पोत्यांबाबत जाब  मागितला. सरकारने तातडीने आठवडाभरात विचारविनिमय करून चौकशी समिती नेमली.&lt;br /&gt;दरम्यान देशातली काही निवडक पंचतारांकित हॉटेल्स  वगळता बारकीसारकी हॉटेलं बंद पडली होती. मुंबईचे प्रसिद्ध डबेवाले बेकार  झाले होते. माणसं कामावर जाताना डबा नेत तो आता त्यांच्या खिशातही मावत  असे. खिसेकापूंची संख्या मात्र त्यामुळे वाढली होती. प्रवासात कुणी दिलेलं  खाऊ नये अशा सुचना रद्द करण्यात आल्या होत्या, कारण कुणाला काही खायला देणं  अट्टल चोरांनाही परवडत नव्हतं. शेजारी कुठे लिफ्टमध्ये दिसले तर  एकमेकांच्या नजरा चुकवत होते. शेजारधर्मच काय, आता कोणत्याही धर्मावर  माणसांचा विश्वास राहिला नव्हता. देशात एकाएकी अशी धर्मनिरपेक्षता आली  होती.&lt;br /&gt;त्याच दिवशी टीव्हीवर दिल्लीतली एक बातमी झळकली. एका  घरातील दोन बहिणी कैक महिने घरातून बाहेर पडल्या नव्हत्या. कॉलनीत त्यांना  बराच काळ कुणी पाहिलं नव्हतं. फ्लॅटमधून वास येत होता म्हणून असह्य होऊन  एका शेजाऱ्याने पोलिसांना कळवलं. घरातून एक बहीण ‘दार उघडणार नाही, निघून  जा’ असं ओरडून सांगत होती. तिचा आवाज क्षीण होता. अखेर पोलिसांनी दार  तोडलं. एक बहीण मरून पडली होती. तिच्या प्रेताचा दरुगध सर्वत्र पसरला होता.  दुसरी बहीणही मरणोन्मुख होती. घरात अन्नधान्य नव्हतं. पाणी नव्हतं. घर घाण  झालेलं होतं. त्यांनी अनेक दिवस आंघोळ न केल्याचं, कपडे न धुतल्याचं,  नखंही न कापल्याचं दिसत होतं. नाकाला रुमाल बांधून पोलिसांनी जिवंत  असलेल्या बहिणीला दवाखान्यात दाखल केलं आणि मग दुसरीचं प्रेत घराबाहेर  काढलं. दवाखान्यातली बहीण दोन दिवसांत मरण पावली. कुणीही नातलग पुढे आले  नाहीत, मग शेजारी तरी काय करणार? काही दिवसांत ठाण्यातल्या एका फ्लॅटमध्ये  वडील आणि भाऊ-बहीण अशी तीन प्रेतं अशाच प्रकारे सापडल्याची दुसरी बातमी  आली. त्या घरात खरंतर थोडं अन्नधान्य आणि थोडे पसे शिल्लक होते. पण तरीही  ही माणसं उपासमारीनं मरून गेली होती. शिल्लक आहे ते कोणत्याही क्षणी संपून  जाईल, अशा भीतीने त्यांनी खाणं कमी केलं असावं आणि मग ते बंदच झालं असावं.&lt;br /&gt;एका टीव्ही चॅनलने या घटनांवर अर्धा तास तज्ज्ञ मंडळींना बोलावून चर्चा  केली. त्यात एक डॉक्टर म्हणाले की हा एक विचित्र प्रकारचा आजारच आहे! पण हा  आजार साथीचा आहे किंवा काय याबाबत डॉक्टर काहीच बोलले नाहीत. रमाच्या मनात  त्या क्षणी थंडी भरून यावी तशी अस्वस्थता दाटून आली. ते रिकाम्या डब्यांचं  आणि रस्त्यावर फिरणाऱ्या पोटं खपाटीला गेलेल्या लोकांचं स्वप्न तिला आता  केवळ रात्री आणि झोपेतच नव्हे तर दिवसाढवळ्या आणि जागेपणीही दिसू लागलं.  त्या स्वप्नात क्षीण आवाजात पुटपुटत हडकुळे हात पसरून ती रस्त्यारस्त्यांवर  फिरत होती. किती गावं, किती शहरं ओलांडली तरी रस्ते संपतच नव्हते. तरीही  तिला भीती मात्र वाटली नव्हती.&lt;br /&gt;पंतप्रधान निवासात गुप्त बठक सुरू होती. काही  खुच्र्यावर पांढरेफेक कडक खळीचे कपडे घातलेले मंत्री बसलेले होते.  त्यांच्या समोरच्या खुच्र्यावर दोन मांजरांच्या आकारांचे काळेकुळकुळीत  उंदीर शेपटय़ा गुंडाळून बसले होते. त्यांचे छोटे डोळे लुकलुकत होते.  वर्षांनुवष्रे ते शेतकऱ्यांचे मित्र म्हणून ओळखले जात. पण आता त्यांनी  पक्षांतर केलं होतं.&lt;br /&gt;शेतकऱ्यांच्या बाजूनं तर आता खुद्द शेतकरीही उरले  नव्हते. गोदामं भरलेली असताना उंदरांनी अन्नधान्याची व्यवस्था करण्यासाठी  अकारण कष्ट करण्याची काय गरज होती? मंत्रीमहोदयांचं हे मत उंदरांना  पूर्णपणे पटलं होतं आणि सरकारीमित्र म्हणून यापुढील उंदरांच्या सर्व पिढय़ा  आयुष्य कंठतील, असं वचन त्यांच्या शिष्टमंडळानं नुकतंच पंतप्रधानांना दिलं  होतं. यावेळी मीडियामुळे जसे कुजलेला धान्यसाठा उघडकीस येण्याचं संकट  सरकारवर आलं, तसं यापुढील वर्षांमध्ये देखील कधीही येऊ शकलं असतं. त्यावेळी  या वेळेइतक्याच तत्परतेनं उंदीर सरकारला सहाय्य करतील आणि त्याबदल्यात  रिकाम्या गोदामांचा उपयोग उंदरांना आपले निवासस्थान म्हणून करता येईल अशी  मांडवली झाली. उंदरांना आता जीव मुठीत धरून माणसांच्या घरात वा उघडय़ावर  थंडी-वारे-पाऊस सोसत राहावं लागणार नव्हतं. शासनाला सहकार्य करणं हे काही  केवळ माणसांचंच नव्हे तर सर्व जीवांचं कर्तव्य असतं, याची जाणीव उंदरांना  झाली होती.&lt;br /&gt;कसं कोण जाणे पण हे रमाला समजलं आणि दारं-खिडक्या  बंद असतानाही भीतीने तिच्या घरात प्रवेश केला. तेव्हापासून डोक्यावर  पांघरूण घेऊन ती रात्रंदिवस झोपून राहू लागली. डोअरबेल वाजूनही तिनं दार  उघडलं नाही की शेजारचा मुलगा वाटी हातात घेऊन काहीतरी उसनं मागायला आला  असेल आणि त्याला द्यायला तिच्याकडे रिकाम्या खडखडाटाखेरीज काहीच नसेल. तिनं  फोनही उचलला नाही की एखादी मत्रीण तिच्या कुटुंबाच्या भूकबळीची बातमी  सांगेल. भुकेल्या पोटी अजिबात झोप येत नसते, हे रमाला माहीत आहे, तरीही ती  सतत झोपून राहते. तिला हेही माहीत आहे की भुकेनं झोप लागली नाही तरी काळझोप  मात्र नक्कीच लागू शकते. &lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6384334779849098020-2485464709788463475?l=bhinn.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://bhinn.blogspot.com/feeds/2485464709788463475/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://bhinn.blogspot.com/2011/12/blog-post_9728.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6384334779849098020/posts/default/2485464709788463475'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6384334779849098020/posts/default/2485464709788463475'/><link rel='alternate' type='text/html' href='http://bhinn.blogspot.com/2011/12/blog-post_9728.html' title='शेजारधर्म'/><author><name>kavita mahajan</name><uri>http://www.blogger.com/profile/16591743012412093153</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='21' src='http://1.bp.blogspot.com/_VOqp55NrS1U/SxAfP-tj-JI/AAAAAAAAAAw/1Ul3tR5jyzM/S220/kavita+Mahajan.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6384334779849098020.post-7831619437161393004</id><published>2011-12-18T08:22:00.000-08:00</published><updated>2011-12-18T08:22:57.439-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कथा२'/><title type='text'>कवी आणि भूक</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;कवीला खरं सांगायचं तर खूप भूक लागली होती. भुकेमुळे त्याला काहीही सुचत  नव्हतं. कविता तर नाहीच नाही. एरवीही कविता काही भूक जशी रोज लागते तशी  रोज सुचायची गोष्ट नव्हती. अगदी भुकेवर कविता लिहायची म्हटलं तरी आधी पोटात  काही थोडंतरी जाणं गरजेचं असतं असं त्याला वाटत होतं. काय उपाय शोधावा  हेही कवीला सुचेना. भुकेनं त्याचा सगळा मेंदू व्यापून टाकला होता. इतक्यात  कुठल्यातरी बारीक फटीमधून समीक्षकाची आठवण डोकावली. कवीच्या भुकेल्या  चेहऱ्यावर किंचित टवटवी उमटली. समीक्षकांनी त्यांच्या बालपणी आईने  पातेल्यात पाणी ओतून दगड शिजवत ठेवल्याची आठवण एकदा सांगितली होती.  सारवलेली चूल, जाळ आणि पाण्याचा उकळता आवाज ऐकत उपाशीपोटी झोपून गेलेली  भुकेली मुलं यांचं करुणामय चित्र कवीच्या डोळ्यांपुढे उभं राहिलं होतं.  तथापि, हे आपण आधी दुसरीकडे कुठेतरी कुणीतरी लिहिलेलं वाचलंय असं त्याला  सारखं वाटत होतं, पण तपशील आठवत नव्हता. समीक्षक म्हणाले होते, मी काही कवी  नाही. अन्यथा या विकल अनुभवावर मी एखादी अमर कविता लिहिली असती. भूक अमर  असते, हे कवीला माहीत होतं. पण अमर कविता कशी असते, ते काही त्याने कुठे  ऐकलं-वाचलं नव्हतं. तरी त्यानं त्यांच्याकडे अविश्वासाच्या नजरेनं पाहिलं  नाही. त्यांचं भाषण ऐकून तर कवीला धीर मिळाला होता.&lt;br /&gt;म्हणजे त्याला काहीबाही सुचत असायचं, पण तो तंद्री  लावून बसला की बाप कमरेत लाथ घालायचा. त्याचं बोलणं ऐकून मित्र मान उडवून  हसायचे आणि वेडावाकडा विचार करतो म्हणून त्याच्यापासून दूर निघून जायचे.  आईला भूक लागल्याचं सांगितलं तर आई किंचाळून म्हणायची, आता चुलीत काय माझी  हाडं घालू का? समीक्षकांच्या आईला जर तांदूळ वा भाजीपाला मिळाला नाही, तर  लाकडं तरी कुठून मिळाली असतील? असा प्रश्न कवीच्या मनात आला. पण असं काही  विचारलं तर ते दुखऱ्या नजरेनं एकदाच विचारणाऱ्याकडे पाहतात आणि मग शून्यात  नजर लावून गप्पच होऊन जातात, असा कवीचा अनुभव होता. त्यामुळे त्यांच्याकडे  जाऊन त्यांचे विचारामृत प्राशन करायचे, त्यासोबत जर त्यांच्या बायकोने चहा  दिला तर तोही प्राशन करायचा आणि परतायचं, यापलीकडे आपण काही बोलायचं नाही,  असं कवीने ठरवून टाकलं होतं. कधी काही नवीन लिहून झालं आणि ते समीक्षकांना  दाखवावं वाटलं तर तो त्याची प्रत त्यांच्या टेबलवर ठेवून यायचा. त्यांनी ते  वाचलं आहे अथवा नाही हे कवीला कधीही समजायचं नाही.&lt;br /&gt;कवी घराबाहेर पडला आणि रस्त्यावर चालू लागला.  रस्त्यावर भरपूर गर्दी होती. वाहनं आणि माणसं आणि मध्येच गायी, गाढवं,  डुकरं, कुत्री. एका जागी उभं राहण्याची सोय नव्हती. माणसं धक्के देत  विचित्र नजरेनं पाहत चालायची. &lt;br /&gt;एकदा एका ट्रकखाली एक कुत्रा आला. पण त्याचं प्रेत  बाजूला काढण्यासाठी थांबावं इतका वेळ कोणत्याच वाहनाला नव्हता. काही  तासांनी पुन्हा त्या रस्त्यावरून परतताना कवीने कसंबसं थबकून त्या जागेवर  पाहिलं, तर कुत्र्याचा आकार सांगणारं सपाट कातडं रस्त्याला चिकटलं होतं.  दुसऱ्या दिवशी आकाराचाही अंश नव्हता. कवीला वाटलं होतं की चालताना आपण असे  पडलो आणि मेलो तर आपलाही आकार थोडय़ा वेळासाठी का होईना या रस्त्यावर उमटेल.  आपल्या कवितेचा ठसा वाङ्मयाच्या इतिहासात उमटला पाहिजे, असं समीक्षक  सांगतात ते असंच काहीतरी असणार असं त्याला वाटलं. पण आता वाङ्मयच कुणी वाचत  नाही, तर वाङ्मयाचा इतिहास कोण वाचणार? हे त्याला सुचूनही त्यानं विचारलं  नव्हतंच.&lt;br /&gt;कवी रस्ता क्रॉस करत होता. झेब्रा क्रॉसिंगच्या  आखलेल्या ओळींवर आयत्या कविता लिहाव्यात असं त्याला वाटलं. त्या कल्पनेच्या  नादात त्याचं सिग्नलकडे लक्ष गेलं नाही आणि खूप वाहनांचे हॉर्न एकाचवेळी  त्याच्या एका कानाशी वाजले. त्याच पाठोपाठ ट्रॅफिक पोलिसाने त्याला बाजूला  खेचलं आणि त्याच्या दुसऱ्या कानाखाली वाजवली. त्यामुळे त्याला दोन्ही  कानांनी ऐकू येईनासं झालं.&lt;br /&gt;पोलिसानं त्याला बाजूला घेऊन सांगितलं की, वाहतुकीला  अडथळा आणण्याचा, नागरिकाचे कर्तव्य भंग केल्याचा आणि आत्महत्येच्या  प्रयत्नाचा असे तीन गुन्हे तो त्याच्यावर दाखल करू शकतो.&lt;br /&gt;पण कवीला काहीच ऐकू येत नव्हतं. पोलिसानं त्याचे  खिसे तपासले, तर एक पूर्ण आणि एक अर्धवट लिहिलेली कविता सापडली. दुसऱ्या  अध्र्या कवितेत शाई संपलेली होती आणि एक-दोन फिकट अ‍ॅनिमिक शब्दांनंतर  वाळलेले लाल रक्त काळे पडावे तसे दिसणारे शाईचे फुलारलेले डाग होते. ते  सगळं पाहून पोलिस म्हणाला, तू कवी आहेस होय?&lt;br /&gt;कवीने अंदाजाने शब्द ओळखून मान डोलावली. पोलिस म्हणाला, अरे मग आधी नाही का सांगायचं? मी पण कवी आहे. &lt;br /&gt;पण तुम्ही तर ट्रॅफिक पोलिस आहात. कवी कसाबसा म्हणाला. त्याचा एक कान आता मोकळा होऊ लागला होता.&lt;br /&gt;होय. मी ट्रॅफिक पोलिस कवी आहे. आमचे साहेब पोलिस  अधीक्षक कवी आहेत. तुला माहीत आहे का की आपल्या बाजूच्या जिल्ह्यात  उपजिल्हाधिकारी कवी आहेत? आणि सरकारी कारकून कवी तर राज्यभर सगळीकडे पसरले  आहेत..&lt;br /&gt;आणि आता मंत्रालय सरकारी कर्मचारी कवींनी पुढाकार  घेऊन कवींची युनियन स्थापन करण्याचे ठरवलेय. राखीव जागांबाबत चर्चा संपली  की युनियन होईलच. मग निधी, साहित्य संमेलनात सहभाग, पुरस्कारांमध्ये  न्याय्य वाटप इत्यादी गोष्टी व्हायला वेळ लागणार नाही. ट्रॅफिक पोलिस कवी  म्हणाला. इतके सगळे लोक कविता लिहितात? कवीनं आश्चर्यानं विचारलं.&lt;br /&gt;होय. माझा कवितासंग्रहदेखील प्रकाशित झाला आहे.  त्याला समीक्षकांची प्रस्तावनादेखील आहे आणि सत्तावीस कवितासंग्रहांची  नक्षत्र-काव्यनगरी रचलेल्या बिल्डर साहित्य संमेलनाध्यक्षकांनी आशीर्वादपर  ब्लर्बही लिहून दिलाय. तेव्हापासून मी समीक्षकांना राँग साइडने स्कुटर  चालवली तरी अडवत नाही आणि संमेलनाध्यक्षांनी गाडी कुठेही पार्क केली तरी टो  होऊ देत नाही. ट्रॅफिक पोलिस कवी अभिमानाने म्हणाला.                   &lt;br /&gt;पण तू कोणता कवी आहेस? त्यानं  कवीकडे आपादमस्तक पाहत विचारलं. प्राध्यापक कवी तर वाटत नाहीस. शिक्षक  कवीही नाहीस. प्लंबर कवी, चित्रकार कवी, सुलेखनकार कवी, वार्ताहर कवी,  कबड्डी कवी, फुगडी कवी, वॉचमन कवी, एजंट कवी, बाइंडर कवी.. छे.. अजिबातच  ओळखू येत नाही. तू गुप्तहेर कवी तर नाहीस ना? पण मग तुझे कपडे इतके फाटके  कसे? तू आत्महत्येतून शिल्लक राहिलेला शेतकरी कवी आहेस का? नाही? मग भिकारी  कवी आहेस? कोणत्या देवळासमोर बसतोस? की अभिनेता कवी आहेस?&lt;br /&gt;मला भूक लागलीये. कवी पुटपुटला.&lt;br /&gt;भूक? म्हणजे तू भिकारी कवीही नाहीयेस तर. नाहीतर  ताजमधून मलाही एक बिर्याणीचं पार्सल पाठव म्हणणार होतो. मलाही भूक लागलीये.  म्हणून तर तुला पकडला होता. नेमका तू नुसता कवी निघालास. आजची बोहणीच अशी  झाली. उपास घडणार असं दिसतंय. जा तू आता इथून. ट्रॅफिक पोलिस कवी त्रासून  म्हणाला. आणि समीक्षकांकडे जाणार असशील तर उपयोग नाही. ते नुकतेच इथून  स्कुटरवर गेले. विश्व मराठी साहित्य संमेलनाला जाण्यासाठी फॅशन स्ट्रीटवर  वापरा आणि फेका अशा कपडय़ांची खरेदी करताहेत. फॅशन स्ट्रीटवरील  विक्रेत्यांच्या वृत्तीचे उत्तर आधुनिक काळातील मराठी कवितेत दिसणारे  प्रतििबब, या विषयावर ते एका विद्यार्थ्यांला पीएच्.डी.साठी मार्गदर्शन  करताहेत. तो विद्यार्थी बाग्रेिनग करण्यासाठी त्यांच्यासोबत गेला आहे.  विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने गेलाबाजार सिंगापूरसोबत  मलेशियाही पाहून येतो म्हणालेत. मलेशियातील देशीवाद आणि भारतातील देशीवाद  यांचा तौलनिक अभ्यास करण्यासाठी एखादी अभ्यासवृत्ती मिळाली, तर बरं होईल  म्हणे. मलेशियात मल्याळम भाषाच बोलली जात असणार, ती भारतीयच. यालाच  विश्वबंधुत्व म्हणतात, असं ते सांगत होते. त्यांच्यासोबत एक आदिवासी कवी,  दोन ग्रामीण कवी, दोन स्त्री कवी आणि चौथ्या नवतेचे दीड महानगरीय कवीदेखील  जाताहेत.&lt;br /&gt;नुसता कवी भुयारी रस्त्यातून पलीकडच्या मदानावर  गेला. तिथे भूक ठिय्या मांडून बसली होती. तिची लाखो पिल्लं मदानात वळवळत  खेळत होती. नुसता कवी भुकेजवळ येऊन निमूट बसला. त्यानं मूठ उघडून दाखवली,  तर हातावर फक्त थोडे शब्द होते.&lt;br /&gt;भूक हसून म्हणाली, कितीही सकस  असले तरी शब्दांनी पोट भरत नसतं. नुसता कवी तसाच बसून राहिला. भुकेची  पिल्लं त्याची बोटं चाटू लागली.&lt;br /&gt;नुसताकवी म्हणाला, तूच तेवढी पुनपुन्हा भेटतेस. बाकी  काही हाती लागत नाही. वाटतं की अखेर नुसत्या कविता लिहून काय मिळतं?&lt;br /&gt;तिथून जाणारा एक सूत्रसंचालक उर्फ मुलाखतकार  म्हणाला, मग कादंबरी लिहा. टीव्ही मालिका लिहा. सिनेमा लिहा. मी नाही का  प्रश्न विचारता विचारता सल्ले द्यायला लागलो, समुपदेशन करायला लागलो.. तसं  कविता लिहिता लिहिता हेही करा. चालताचालता बोलत तो दिसेनासा झाला. त्याची  आमदार कवींसोबत चालतीबोलती मुलाखत चाललेली होती. एका टीव्हीचॅनलवर तिचं थेट  प्रक्षेपण सुरू होतं. दहशतवादी कवींच्या वाढत्या हल्ल्यांबाबत ते  गांभीर्यानं काव्यात्म चर्चा करत होते.&lt;br /&gt;नुसत्या कवीनं जेमतेम पापण्या उचलल्या. तो कसाबसा  पुटपुटला, ‘काहीही.. काहीही म्हणजे.. एकूणच.. लिहिल्यानं.. काय मिळतं?’&lt;br /&gt;भूक खदाखदा हसली. तिच्या जटा वडाच्या  पारंब्यांसारख्या झुलू लागल्या. तिचे दात करकरीत होते आणि जीभ लांबलचक  लवलवत होती. बेडकानं जीभ लांबवून किडा पकडावा तसं तिनं आपल्या खरखरीत  जिभेनं नुसत्या कवीला लपेटून घेतलं आणि क्षणार्धात कराल दाढेखाली सरकवलं.  त्याला कचाकचा चावत गिळून टाकताना भुकेला जाणवलं, नुसत्या कवीची चव अस्सल  होती!&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6384334779849098020-7831619437161393004?l=bhinn.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://bhinn.blogspot.com/feeds/7831619437161393004/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://bhinn.blogspot.com/2011/12/blog-post_18.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6384334779849098020/posts/default/7831619437161393004'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6384334779849098020/posts/default/7831619437161393004'/><link rel='alternate' type='text/html' href='http://bhinn.blogspot.com/2011/12/blog-post_18.html' title='कवी आणि भूक'/><author><name>kavita mahajan</name><uri>http://www.blogger.com/profile/16591743012412093153</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='21' src='http://1.bp.blogspot.com/_VOqp55NrS1U/SxAfP-tj-JI/AAAAAAAAAAw/1Ul3tR5jyzM/S220/kavita+Mahajan.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6384334779849098020.post-1949938876839542728</id><published>2011-12-18T08:16:00.000-08:00</published><updated>2011-12-18T08:16:02.652-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कथा१'/><title type='text'>म्हणे, लाजेला इलाज नाही...</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;मनोरुग्णालयात गुडघ्यात मान घालून बसलेल्या सत्यवतीला काहीही उलटसुलट  आठवत होतं. या क्षणी तिला आठवली ती गेल्या आठवडय़ात गावात टीव्हीवाले लोक  आले होते, त्यांच्यातली मुलगी. तिचा चेहरा हसरा होता. तिनं पँटशर्ट घातलं  होतं. वाऱ्यानं तिचे मोकळे केस सारखे उडत होते, तरी ते न बांधता एका हाताने  सावरत दुसऱ्या हातात माइक धरून ती बोलत होती. तिला कशाचीही भीती वाटत  नसावी. इथल्या सगळ्या लोकांना, बायकांनाच नाही तर पुरुषांनाही ती  पुन:पुन्हा म्हणत होती, ‘‘घाबरू नका. सत्य सांगा.’’ आणि कॅमेऱ्याकडे पाहून  म्हणत होती, ‘‘फक्त आमच्याच चॅनलवर पहा.. आंखो देखा हाल.. थेट शूरगावातून..  अबला स्त्रिया आणि दुबळे पुरुष! ..कुठेही जाऊ नका.. पाहात रहा..’’&lt;br /&gt;गावात एका घरावर दरोडा पडला होता. त्यानंतर त्या  घरातील लहान-मोठय़ा म्हाताऱ्याकोताऱ्या सगळ्या बायकांवर सामूहिक बलात्कार  झाला होता. दरोडेखोरांनी शेजाऱ्यांच्या दारांना बाहेरून कडय़ा लावल्या  होत्या. माणसांची माणुसकी केव्हा उफाळून येईल आणि आपला जीव धोक्यात घालून  शेजाऱ्यांचा जीव वाचवायला ते केव्हा धावून येतील, याची दरोडेखोरांना काही  खात्री वाटत नसावी. समूहाचं मानसशास्त्र अजून भल्याभल्यांना उलगडलेलं नाही.  एका घराबाहेर दिसलेल्या मोटरसायकलची त्यांनी मोडतोड केली होती आणि दोन  सायकलींची हवा काढून टाकली होती. घरातली दोन-पाच हजारांची रोख रक्कम,  तीन-चार तोळे सोनं लुटून घेऊन, मग सगळ्या बायकांवर बलात्कार केला होता.  सकाळी शेजाऱ्यांना त्या घरातून एक लहानसा करुण रडण्याचा स्वर ऐकू आला.. आणि  मग दार उघडल्यावर भेसूर म्हातारी शांतता उंबरठय़ाशी येऊन कोसळली. &lt;br /&gt;लोक जमले. सरपंच, पोलिस पाटील आले. पोलिस तक्रार  करायची की करायची नाही याची चर्चा सुरू झाली. नुसते बलात्कारच नाही, तर  चोरीही झाली होती. आज या घरावर वेळ आली, उद्या दुसऱ्या घरावर आली असती.  तक्रार होत नाही म्हणून चोर सोकावले तर ते गावाला परवडण्याजोगं नव्हतं.  सरपंचांनी भाडय़ानं गाडी बोलावली. गाडीत त्या घरातल्या बायकांना घालून  जिल्ह्याला पोलिस स्टेशनला नेलं. मग दवाखान्यात तपासणी करून, औषधांची  चिठ्ठी घेऊन बायका घरात परतल्या. गावावर सुतकी कळा आली.&lt;br /&gt;तिकडे पोलिस स्टेशनवर आधी पेपरवाले आणि पाठोपाठ टीव्ही  चॅनल्सवाले आले. ‘बलात्कार झाला, पण सामूहिक बलात्कार झाला नाही,’ असं  साहेबांनी सांगून टाकलं. साहेब आधीच त्रासलेले होते. मनाशीच बडबडत बसले  होते.. आता एकल काय दुक्कल काय आणि सामूहिक काय, बलात्कार तो बलात्कार. आता  ही काय गवगवा करण्याजोगी गोष्ट आहे का?&lt;br /&gt;सरपंच खेदानं मान हलवत म्हणाले, ‘‘साहेब, तक्रार  नोंदवून घ्या. आमच्या गावची लाज गेली, ती काय आता परत येणार आहे का?’’  साहेब अधिकच वैतागले. एकाच वेळी तीन-तीन तक्रारी घेऊन येतात हे लोक. आधीच  पोलिसांची संख्या इतकी कमी आहे, त्यात बलात्कार आणि चोरी आणि लाजही हरवली!&lt;br /&gt;पण मुळात लाज जाणार कुठे? बायका इथेच आहेत, लाज इथेच  आहे.. आहे म्हणजे असणारच. बायका आहेत म्हणजे लाज असलीच पाहिजे. पुरुषांचा  आणि लाजेचा काय संबंध? आणि पोलिसांचा आणि लाजेचा तरी काय संबंध?&lt;br /&gt;कुणाकुणावर लक्ष ठेवायचं? रॉकेलचा काळाबाजार करणारे  बघायचे. दुधात भेसळ करणारे बघायचे. दारू-जुगार-सट्टावाले बघायचे.  चोर-दरोडेखोर बघायचे. नक्षलवादी-दहशतवादी बघायचे. सत्ताधारी आणि विरोधी  पक्षनेत्यांना संरक्षण पुरवायचं.&lt;br /&gt;या सगळ्यातून गेली असेल लाज कुठेतरी निघून तर कसं  कळणार? असेल गावातच कुठेतरी. देशातून तर पळून जाणार नाही..! गेली असेल तर?  देशात दर ५४ मिनिटाला एक बलात्कार होतो. म्हणजे दिवसाला किमान ५३ केसेस  येतात. स्त्रियांसाठी जगातल्या सगळ्यांत असुरक्षित देशात भारताचा तिसरा  क्रमांक लागतो, कारण इथल्या बलात्कारांची संख्या ८०० टक्क्यांनी वाढते आहे.  देशाचा तिसरा क्रमांक आहे म्हणजे देशाचीही लाज गेली की काय? नशीब देश  आपल्या अखत्यारीत येत नाही. साहेबांनी सुटकेचा निश्वास टाकला. तोच एका  पत्रकाराने अब्रूची भानगड काढली. हे काय नवीन म्हटलं तोवर हवालदार कानात  कुजबुजला, ‘काही नाही साहेब, ते लाजेचंच दुसरं नाव आहे. तुम्ही अमराठी आहात  ना, म्हणून तुम्हांला अर्थ कळला नाही.’ लाज, लज्जा, शरम, अब्रू सगळं एकच.  हे तर भलतंच लफडं होतं. गुन्हेगारच अशी दोन-दोन, चार-चार नावं घेऊन  वावरतात. काल्या टपोरी उर्फ घोडा मारुती उर्फ काíतक शेटय़े पकडला होता ना  एकदा. चांगला सोलला होता. आपल्याला आडनाव नसतानाही सोलकर म्हणतात  तेव्हापासून. अर्थात माघारी. समोर हिम्मताय का कोणाची? पण म्हणजे लाज ही  कुणी सराईत गुन्हेगार आहे की काय? मोकाट सुटलेला गुन्हेगार? अजून कुणालाच  लाजेला अरेस्ट करणं जमलेलं नाही? म्हणजे लाज हे आपल्याला चॅलेंज आहे? असं  असेल तर हे चॅलेंज स्वीकारलंच पाहिजे!&lt;br /&gt;साहेबांच्या विधानानं पत्रकारांना उकळ्या फुटल्या आणि  हवालदाराच्या कानाखाली जाळ पेटल्यासारखं ते वाक्य आदळलं. आता साहेबांची  त्याला काळजी वाटू लागली. कमिशनरसाहेबांची काळजी वाटू लागली.  गृहमंत्र्यांची काळजी वाटू लागली. मुख्यमंत्र्यांची काळजी वाटू लागली.  पोलिसखात्याची काळजी वाटू लागली. खाकी वर्दीची काळजी वाटू लागली. ग्लासातला  फुकटचा कटिंग चहाही त्याला गोड लागेनासा झाला. चहावाला म्हणाला, ‘काळजीच  वाटतेय ना, लाज नाही ना वाटत?’ आता हवालदाराकडे यायला बिचकतेय ती लाज  अधीक्षकांकडे जाईल का? कमिशनरसाहेबांकडे जाईल का? गृहमंत्र्यांकडे,  मुख्यमंत्र्यांकडे जाईल का? &lt;br /&gt;हवालदारानं घाईघाईनं म्हणाला, ‘नाही. लाज  पोलिसखात्यातल्या कुणाकडेही नाही आणि मंत्र्यापर्यंत असं उठसुट कुणीही जाऊ  शकत नाही. त्यामुळे लाज राजकारण्यांकडेही नाही. त्यांच्याकडे लाज नसेल तर  आपला काही इलाज नाही.’ ‘आपण सामान्य माणसं!’ चहावाला म्हणाला. साहेब अजून  त्रासलेलेच होते. मध्यंतरी शासनातर्फे झालेल्या आदिवासींच्या सामूहिक विवाह  सोहळ्याला आशीर्वाद द्यायला पाहुणे म्हणून ते हजर झाले होते. तब्बल तीस  जोडपी, म्हणजे एकूण साठ नवरा-नवरींची त्यादिवशी एका मंडपात लग्नं लागली  होती. साठ लोकांची सामूहिक लग्नं कव्हर करण्यात मीडियाला इंटरेस्ट वाटला  नाही, पण सहा बायकांवरचा सामूहिक बलात्कार कव्हर करायला मात्र लगेच धावले..  साहेब अजून स्वतशी पुटपुटत होते. तोवर पक्षातला महिला विभाग सांभाळणाऱ्या  प्रमुख महिला नेत्या गावात दाखल झाल्याची बातमी आली आणि चॅनलवाले पुन्हा  तिकडे पळाले. गेल्यावर समजलं की बाई येताना दुसऱ्या एका चॅनलवाल्यांना  घेऊन, म्हणजे चॅनलवाल्यांच्याच गाडीतून इथं आल्या होत्या. त्यांची स्वतची  नाजूक- देखणी- सुबक- ठेंगणी कार या रस्त्यावर कोसभरही चालली नसती. &lt;br /&gt;पुन्हा तिच्यावर कधी साधी धूळ साचलेलीही त्यांना खपायचं नाही, इथं तर कसकसले डाग पडले असते.                      &lt;br /&gt;&lt;div class="style1"&gt;लाज ही कुणी सराईत गुन्हेगार आहे की  काय? मोकाट सुटलेला गुन्हेगार? अजून कुणालाच लाजेला अरेस्ट करणं जमलेलं  नाही? म्हणजे लाज हे आपल्याला चॅलेंज आहे? असं असेल तर हे चॅलेंज  स्वीकारलंच पाहिजे!&lt;/div&gt;डाग! त्यांना एकदम ध्यानात  आलं की बातमी समजल्यावर लगेच इथं फोन करायला हवा होता. बायका वेडय़ासारख्या  वागतात नको तेव्हा आणि बलात्कारानंतर लगेच आधी आंघोळिबघोळ करतात. कितीही  वेळ गेला तरी त्यांनी आंघोळ न करता तसंच, त्याच कपडय़ांनिशी पोलिस स्टेशन,  दवाखाना इत्यादी सगळीकडे गेलं पाहिजे. डाग नष्ट करणे म्हणजे बलात्काराचा  पुरावा नष्ट करणे. इतकी प्राथमिक माहितीदेखील असू नये म्हणजे काय? दाग  अच्छे होते है. पण आपल्या देशातल्या बायका अजून अडाणी त्या अडाणीच, कधी  शहाणपण येणार यांना देव जाणे. अब्रूवरचा डाग तर आयुष्यभर धुतला जाणार नसतोच  ना, मग हे रक्ताचे न् वीर्याचे डाग धुवायची घाई कशाला करतात? इतकी मेली  कसली लाज वाटते या बायकांना? बाई त्या घरात पोहोचल्या. बायकांपकी कुणी  गुडघ्यात डोकं घालून बसली होती, कुणी तोंडावर पदर घेऊन आडवी निजून होती.  कॅमेरे पाहून त्यांनी घाईघाईनं डोक्यावरचा पदर तोंडावर ओढून घेतला. ‘तुमचे  चेहरे दाखवले जाणार नाहीत. ते ब्लर केले जातील. फक्त बाकी शरीर दाखवतील.  चेहरा न दिसल्यावर शरीराची कसली लाज? घाबरू नका. लाजू नका. काय झालं ते  सगळं स्पष्ट शब्दांत मोकळेपणाने मला सांगा.’ बाई आपला कडक पदर नीट करत  म्हणाल्या. त्यांना आजकाल वजन वाढल्याने मान वेळावता येत नव्हती. पण  कॅमेऱ्यात पाठ दिसणं म्हणजे प्रेक्षकांचा अपमान! अखेर कॅमेरामनच्या  सूचनेनुसार त्यांनी सांत्वनासाठी बसायची जागा दोन-तीन वेळा बदलली. बाकी  बलात्कारित बायका अंधारात असणंच अधिक प्रतिकात्मक ठरलं असतं.&lt;br /&gt;जर शरीराच्या बाकी गोष्टींमध्ये लाज नाही आणि चेहरा  महत्त्वाचा आहे, तर बाकी अवयवांची इतकी पर्वा का केली जाते? योनी वारंवार  इतकी महत्त्वाची का ठरते? चेहरा दाखवायला वा चेहरा हा शब्द छापायला,  उच्चारायला लाज वाटत नाही, तर योनी, स्तन हे शब्द का लाजिरवाणे ठरतात?  सत्यवतीच्या मनात प्रश्न धुमसू लागले. सत्यवती डीएड्. करत होती आणि आता हे  तिला कळून चुकलं होतं की या घटनेनंतर तिचं शिक्षण बंद केलं जाणार होतं.  बलात्कारित बाई काय शिकणार आणि काय शिकवणार?&lt;br /&gt;बाईंनी पुनपुन्हा विचारूनही बायका काही बोलल्या  नाहीत. गावातली, नात्यागोत्यातली काही पुरुषमंडळी जमली होती. त्यांनी  घटनाक्रम सांगितला. बायकांना अंधारात चोरांचे चेहरे दिसले नाहीत, म्हणाले.  बाईंच्या कपाळावर आठय़ा उमटल्या. पुरुषांसारखे पुरुष.. काय मोठी निराळी  वर्णनं करायची असतात? त्या वैतागल्या. लाज.. लाज आणतात असं वागून या अडाणी  बायका! पण इतकेवेळा उल्लेख करूनदेखील लाज बाईंकडे फिरकलीही नाही.&lt;br /&gt;घराण्याची लाज गेली याची नातेवाईकांना काळजी होती.  जातीची लाज गेली म्हणून जातबंधू त्रासले होते. गावाची लाज गेली म्हणून  गावकरी एकमेकांची तोंडं चुकवत होते. पण या बायका खाली माना घालून का बसल्या  होत्या? त्यांच्याजवळ लाज कुठे दबूनलपून बसलेली होती की काय? एकाएकी  आतल्या काळोखातून एका प्रौढ बाईनं हंबरडा फोडला. ती या कुटुंबातली होती,  गावातली होती, राज्यातली आणि देशातलीही होती. तिनं आपल्या डोक्यावरचे केस  उपटायला सुरुवात केली. अंगावरचं लुगडं फेडत ती गावातून नागडी पळत सुटली, ते  गावाबाहेरच्या कोरडय़ा विहिरीत उडी मारूनच शांत झाली. लोक दोर बांधून  विहिरीत उतरले. रक्ताळलेल्या योनीची, चिरफाळलेल्या स्तनांची, ओरबाडलेल्या  त्वचेची लाज कोरडय़ा विहिरीतल्या दगडावर डोकं आपटून फुटून मरून पडली होती.  ‘बलात्कार आणि खुनाचाही गुन्हा नोंदवा..’ सत्यवती अंगणात येऊन कॅमेऱ्यावर  दगड मारत किंचाळत सांगत होती.&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6384334779849098020-1949938876839542728?l=bhinn.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://bhinn.blogspot.com/feeds/1949938876839542728/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://bhinn.blogspot.com/2011/12/blog-post.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6384334779849098020/posts/default/1949938876839542728'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6384334779849098020/posts/default/1949938876839542728'/><link rel='alternate' type='text/html' href='http://bhinn.blogspot.com/2011/12/blog-post.html' title='म्हणे, लाजेला इलाज नाही...'/><author><name>kavita mahajan</name><uri>http://www.blogger.com/profile/16591743012412093153</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='21' src='http://1.bp.blogspot.com/_VOqp55NrS1U/SxAfP-tj-JI/AAAAAAAAAAw/1Ul3tR5jyzM/S220/kavita+Mahajan.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6384334779849098020.post-6124802253517711229</id><published>2010-02-27T22:29:00.001-08:00</published><updated>2010-02-27T22:31:18.852-08:00</updated><title type='text'>आम्ही लाचारांच्या फौजा</title><content type='html'>&lt;strong&gt;सेन्सॉरशिप, दहशतवाद, झुंडशाही..&lt;/strong&gt; असे काही शब्द, साहित्याच्या संदर्भात यावर्षीच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या वेळचा जो नवा धुरळा उडाला आहे, त्या निमित्ताने पुन्हा पटावर आलेत.&lt;br /&gt;वारकऱ्यांनी असे वागावे का? लोकशाहीचे काय? लेखक-कलावंतांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे काय? अध्यक्षाविना संमेलन कसे? साहित्यिक मूग गिळून गप्प का बसले? ज्याने माफी मागितली व अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, तो यादवांसारखा साहित्यिक एकाकी का पडला? महामंडळानेही त्यांची बाजू का उचलून धरली नाही? समाजात साहित्यिकांची बूज का राखली जात नाही? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उफाळून आले.&lt;br /&gt;आठवडाभर वृत्तपत्रांमधून आणि टीव्हीवर याची चर्चा चालेल. मग आपण ते विसरून जाऊ. पुढच्या वर्षीच्या संमेलनाच्या वेळी गेल्या अनेक वर्षांच्या कुजलेल्या कचऱ्यासह काही कचरा आठवेल. पुन्हा नव्या घाणीने डोकी बरबटून घेण्याची मानसिक तयारी करावी लागेल.&lt;br /&gt;जे काम, अभ्यास, वाचन इत्यादी आपल्याला मनापासून आणि गांभीर्याने करायचे आहे, ते थांबवून, लेखणी बाजूला ठेवून, लेखकांनी हातात झाडू घ्यावा.. अशी परिस्थिती हे लोक दरवर्षी का आणतात?&lt;br /&gt;                    हे कोण लोक आहेत? बाहेरचे लोक आहेत की घरातलेच लोक आहेत?&lt;br /&gt;                                         &lt;table width="205" align="RIGHT" border="0" cellpadding="0" cellspacing="0"&gt;                       &lt;tbody&gt;&lt;tr&gt;                         &lt;td width="5"&gt; &lt;/td&gt;                         &lt;td width="200"&gt;&lt;script language="javascript" src="http://www.expressindia.com/loksatta/200X200.js"&gt;&lt;/script&gt;                        &lt;br /&gt;&lt;/td&gt;                       &lt;/tr&gt;                     &lt;/tbody&gt;&lt;/table&gt;                     बाहेरच्यांनी घाण केली, तर बोटे रोखता येतात.. घरातल्यांचे काय करायचे? दुर्लक्ष करत घाण सहन करत राहायची की त्यांना घराबाहेर काढायचे की आपण घराबाहेर पडायचे?&lt;br /&gt;                      त्याआधी हे सगळे नेमके काय आहे आणि का आहे, हे एकदा आपण दुसऱ्या भाषेतले असल्याप्रमाणे पाहूया.&lt;br /&gt;                      ० ० ०&lt;br /&gt;मराठीत लिहिणाऱ्या लेखकांची, वाचणाऱ्या वाचकांची, दरवर्षी छापल्या जाणाऱ्या पुस्तकांची आणि ही पुस्तके प्रकाशित करणाऱ्या प्रकाशकांची संख्या वाढते आहे.. ही वस्तुस्थिती आहे. त्याच जोडीने पुस्तक प्रदर्शने, साहित्यिक गप्पांचे कार्यक्रम, व्याख्यानमाला, साहित्यविषयक पुरस्कार, लहान-मोठी साहित्य संमेलने यांचीही संख्या वाढते आहे. वृत्तपत्रांच्या स्थानिक आवृत्त्या निघू लागल्याने त्या त्या भागातल्या लहान-लहान उपक्रमांनाही तात्काळ आणि मोठी प्रसिद्धी मिळू लागली आहे. रंगीत पुरवण्यांमधून फोटो झळकू लागले आहेत. टीव्ही चॅनेल्सची संख्या वाढल्याने तिथेही कधी सहज, तर कधी थोडय़ाशा लटपटी करून चमकता येऊ लागलेय. या क्षणभर चमकण्याचे भांडवल बराच काळ करून घेता येऊ शकते आणि आपल्या सुमारपणाला प्रसिद्धीचे पॉलिश करून झाकता येऊ शकते, हे लक्षात घेऊन बरीच मंडळी प्रकाशझोतात येऊ व राहू लागली आहेत. महर्षी, पंडित, विदूषी, महागायक, अभिनय सम्राट, कलारत्न अशा पद्धतींच्या विशेषणांची सहज खैरात होते आहे. पाचशे- हजार रुपयांच्या गल्लीतल्या पुरस्कारांपासून ते लाखभराच्या एनआरआय पुरस्कारापर्यंत पुरस्कार वाटले जाताहेत. विविध कार्यक्रमांची, संमेलनांची अध्यक्षस्थाने, उद्घाटक, प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रणे यांची रेलचेल वढते आहे.&lt;br /&gt;                      यालाच यश म्हणतात, असे नव्या पिढीलाही वाटू लागण्याचा मोठा धोका त्यातून तयार होतो आहे.&lt;br /&gt;                      ० ० ०&lt;br /&gt;                      संमेलनाचे काय होते आणि संमेलनात काय होते, हे आता सगळ्यांना माहीत आहे.&lt;br /&gt;                      राजकीय लोकांचे आणि प्रसारमाध्यमातील लोकांचे उंट तंबूत घुसलेत आणि तंबूतले साहित्यिक कधीच उघडय़ावर आलेत.&lt;br /&gt;अध्यक्षीय भाषणात आत्मचरित्र, वाङ्मयाच्या इतिहासाचा थोडक्यात आढावा आणि मराठी भाषा टिकणार की नाही याची चिंता, याखेरीज काही सापडत नाही. परिसंवादातल्या नेहमीच्या विषयांवर जुजबी विचारांच्या पाटय़ा टाकल्या जाताहेत. ठरावांना काहीएक किंमत राहिलेली नाहीये.&lt;br /&gt;ज्यांची काहीही साहित्यिक ओळख समाजमानसात नाही, अशा सुमार आणि कल्पनाशून्य लोकांनी साहित्यसंस्थांचा ताबा मिळवला आणि राखला आहे.&lt;br /&gt;संमेलनाचे स्वरूप वर्षांनुवर्षे अधिकाधिक रटाळ होत चालले आहे. उथळ मनोरंजनाची मागणी वाढते आहे आणि ती अभिनेते- गायक- मिमिक्रीवाले अशांना आणून पुरी होत नाही की काय वाटल्याने महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी ती जबाबदारी स्वीकारून यशस्वी करून दाखवली आहे.&lt;br /&gt;                      ० ० ०&lt;br /&gt;                      काही सुजाण साहित्यिकांनी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद आजवर सातत्याने नाकारले आहे. &lt;img src="http://www.loksatta.com/old/daily/20090329/su06.jpg" width="183" align="right" height="200" /&gt;तरीदेखील अध्यक्ष झालो की पोचलो.. असे समजणाऱ्या साहित्यिकांची संख्या त्यांच्या तुलनेत बरीच मोठी आहे. ही शिडीची सगळ्यात वरची पायरी आहे, अशी त्यांची भावना असते. पण आपण त्या वेळी शिडीच्या अधेमधेच असतो आणि अध्यक्ष बनलो की ही उभी शिडी आयोजक वा महामंडळ आडवी करतात आणि शिडीची तिरडी बनून जाते, हे लक्षात येते तोवर वेळ निघून गेलेली असते. मेलेल्याकडे कुणी बघत नाही, सगळे रडणाऱ्यांकडे बघतात, हार घालणाऱ्यांकडे बघतात, श्रद्धांजलीची भाषणे करणाऱ्यांकडे बघतात, पेटवणाऱ्यांकडे बघतात. हे नाटय़ दरवर्षी पाहूनही यांना काही धडा घेता येत नाही का? की- ‘उनके घर और सिर्फ उनके घर.. जाईये और बिन बुलाये जाईये..’ अशी प्रेयसीच्या घरी आमंत्रणाची वाट पाहायचीच नसते, कितीही अपमान झाला तरी चालेल, प्रेम महत्त्वाचे!-&lt;br /&gt;तसे त्यांना या अध्यक्षपदाविषयी प्रेमभावना आहे ? ही अध्यक्षपदाची हाव नेमकी कशासाठी असते? गेली अनेक वर्षे जी लहान-मोठी संमेलने मी पाहतेय, तिथे अध्यक्षांच्या बाबतीतील किमान प्रोटोकॉलही आयोजकांकडून, महामंडळाकडून पाळला जाताना दिसला नाही. मग इतर साहित्यिकांना कसे वागवले जाते ही गोष्टच अलहिदा. अध्यक्षांना साधे स्टेशनवर घेण्यासाठी न येणे, त्यांची निवासव्यवस्था कोठे आहे याचा पत्ता नसणे, अध्यक्ष गावात पोहोचले तरी आहेत की नाही याची पर्वा नसणे, त्यांचा चहा-नाश्ता-जेवण याचीही काळजी- निदान त्यांचे वय, आजार इत्यादी लक्षात घेऊन- केलेली नसणे.. अशा गोष्टी नेहमीच्या झाल्या आहेत.&lt;br /&gt;अध्यक्षीय भाषण कुणीही पूर्णपणे व गांभीर्याने ऐकत नाही. अर्थात त्यात ऐकावे असे काही असते का, हा अजून एक वेगळाच मुद्दा आहे. अध्यक्षीय भाषणातसुद्धा काय बोलावे- बोलू नये याबाबतीत दबाव आणले गेल्याचे सर्वज्ञात आहेच. वर्षभरात काही किरकोळ सत्कार, काही शाली, काही भाषणे.. अजून काय निष्पन्न होते अध्यक्षपदातून?&lt;br /&gt;                      ० ० ०&lt;br /&gt;                      आपल्या वागण्याने लेखक आपले समाजातील आदराचे स्थान गमावून बसले आहेत.&lt;br /&gt;ज्योतिष्याकडे पत्रिका दाखवून, ‘मला ज्ञानपीठ मिळेल का’, असे अमाप लोकप्रियता, बरेचसे मानसन्मान मिळालेल्या कविवर्यानाही विचारावेसे वाटते. पुरस्कार मिळावेत यासाठीच्या खटपटी, दुसऱ्यांना मिळाले की त्यांचे मत्सर, त्यापायी त्यांची बदनामी.. अशा गोष्टींमध्ये आमचा वेळ चांगला जातो.&lt;br /&gt;‘यांची चरित्रे लिहिली गेली पाहिजेत, ती बखरींइतकीच महत्त्वाची व श्रेष्ठ ठरतील’, अशी लाळघोटी विधाने भ्रष्ट आणि गुंड राजकीय नेत्यांच्या बाबतीत संमेलनांच्या व्यासपीठावरून वाकवाकून करण्याइतके आमचे कणे मोडले आहेत.&lt;br /&gt;आमचे वाढदिवस, अमृत महोत्सव इत्यादी आम्ही कसे साजरे करून घेतो हे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. शाळेतल्या शिक्षकांकडून पाच दिवसांचा पगार वर्गणी म्हणून घेऊन चांदीची समई भेटीदाखल मागण्याइतका आणि हा आपला हक्क आणि ज्या गावात आम्ही जन्मलो त्या गावकऱ्यांची ही जबाबदारीच समजण्याइतका आम्हाला स्वत:च्या आणि फक्त स्वत:च्याच लेखनकर्तृत्वाविषयी आदर आहे.&lt;br /&gt;ज्या व्यासपीठाने आम्हाला प्रतिष्ठा देऊ केली त्या व्यासपीठावर दारू ढोसून कविता गायला बसण्याइतके आम्ही निर्लज्ज बनलो आहोत. कार्यक्रम संपल्यानंतर कितीही प्या न् कुठेही पडा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहेच, पण माईकसमोर झुलत-झुलत जाण्यात आम्हाला यत्किंचितही लाज वाटत नाही. स्टेजवरून भले आईच्या थोरवीचे आणि प्रेयसीच्या प्रेमाचे गोडवे गायले असोत.. तिथून उतरले की आम्ही आमची भाषा इतकी गलिच्छ तऱ्हेनेही वापरून दाखवू शकतो, हेच बायकांबाबत बोलत ही कवीमंडळी सिद्ध करतात. जणू आमचा सगळा चांगुलपणा कवितेत उतरून संपून जातो आणि जगता-वागताना व्यवहारात वापरायला तो शिल्लकच राहत नाही.&lt;br /&gt;व्यसनांपायी, जबाबदाऱ्या टाळून अवलंबलेल्या चुकीच्या जीवनशैलीपायी दुखणीखुपणी आमच्या वाटय़ाला येतात तेव्हा समाजाने वा शासनानेच आमच्या औषधपाण्याचा खर्च उचलावा, अशी मागणी करताना, ‘आपण समाजासाठी नेमके काय केलेय?’ असा प्रश्न आमच्या मनातही येत नाही.&lt;br /&gt;या साऱ्या उठाठेवींमध्ये लेखन, लेखनासाठी अभ्यास, चिंतन, संशोधन, वाचन, निरीक्षण, चर्चा, वादविवाद अशा गोष्टी करण्यासाठी वेळ आहे कुणाला? आणि गरज तरी आहे का आता या कालबाह्य गोष्टींची? लेखनाबाबत निष्ठा, प्रेरणा, जाणिवा असे शब्द आमच्या कोशातून कधीच गायब झाले आहेत. जे लेखक अजून हे शब्द वापरतात वा तसे वागतात, ते आता आमच्या टिंगलीचे विषय बनले आहेत.&lt;br /&gt;शुद्धलेखनसुद्धा तपासले न जाता जसाच्या तसा मजकूर आमची मासिके छापून टाकतात. प्रकाशन संस्थांमध्ये संपादक असण्याची प्रथा दोन-पाच ठिकाणीच शिल्लक आहे, पण तिथले संपादक थोर आहेत. संपादन म्हणजे काय याच्या व्याख्या तेवढय़ा त्यांना पाठ आहेत, प्रत्यक्षात संपादनाच्या नावाखाली ते प्रूफ रीडरने डीटीपीवाल्यांना कराव्यात तितपतच सूचना देऊ शकण्याच्या कुवतीचे आहेत. संपादक वाचतात, म्हणजे आम्ही वाचण्याची गरज नाही, असे प्रकाशकांना प्रामाणिकपणाने वाटते. लिहिणाऱ्याने रक्त आटवून लिहिलेले असले तरी ते वाचण्याहून प्रकाशकांच्या प्रायोरिटीज् वेगळ्या असतात. लेखकांची संख्या दोन-चारशेच्या घरात गेल्यावर ते तरी काय करणार? लेखकांसोबत संवाद, चर्चा, चित्रकारासोबत चर्चा हे तर अनावश्यकच ठरते आहे. संगणकाच्या तंत्रज्ञानामुळे पुस्तक काढणे अत्यंत सोपे आणि झटपट उरकण्याचे काम बनले आहे. थोडी फोटोग्राफी आणि संगणकावर कटिंगपेस्टिंग करता येणारी मंडळी मुखपृष्ठकार बनली आहेत. अशी परिस्थिती असताना पदरमोड करून जागरणे करत, घरदार- पोटापाण्याचा उद्योग बाजूला सारत लेखकांनी लिहावे का? असा साळसूद प्रश्न जगणे आणि लिहिणे एकच नसणाऱ्या लेखकांना पडणे स्वाभाविक आहे.&lt;br /&gt;                      ० ०                    ०&lt;br /&gt;काही वृत्तपत्रांनी आम्ही पुस्तक परीक्षणे छापणार नाही, प्रकाशकांनी हव्या तर पुस्तकांच्या जाहिराती कराव्यात, अशी भूमिका घेतली आहे. एकूणच वृत्तपत्रांमधून साहित्यविषयक बाबींना स्थान देणे कमी झाले आहे. चोवीस तास चालणाऱ्या टीव्ही चॅनल्सवर साहित्यविषयक दर्जेदार कार्यक्रमांचा अभाव आहे, पण संमेलनाचा असा धुरळा उडाला की, ‘आमचे लेखक भेंडी-गवार का आहेत?’ असे प्रश्न विचारायला हेच चॅनलवाले उत्साहाने पुढे सरसावतात. सत्तर-ऐंशी टक्के कमिशनने जिथे सुमार दर्जाची पुस्तके खपवली जातात, त्या पुस्तक बाजाराला ‘बुधवारबाजार’ असे संबोधले जाते. या कशानेच आमचा जीव दुखत नाही.&lt;br /&gt;अद्याप आमची पंचवीस- पंचवीस हस्तलिखितं जाळली जात नाहीयेत. आम्हाला तुरुंगवास घडत नाहीयेत, आमच्यावर जीवघेणे हल्ले होत नाहीयेत, आम्हाला देशातून हद्दपार व्हावे लागत नाहीये. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा कराव्यात इतकी जाणीवप्रू्वक अभिव्यक्ती आम्ही करतोच कुठे आहोत?&lt;br /&gt;आम्ही तर कुणी विकत घेण्याच्याही लायकीचे राहिलेलो नाही आहोत, आधीच लोटांगण घालून खुर्ची आणि कॅमेरे ज्यांच्या ताब्यात आहेत, त्यांचे तळवे चाटायला तयार आहोत.&lt;br /&gt;                      कचरा वाढतो आहे.&lt;br /&gt;वारकऱ्यांचा जो तथाकथित दहशतवाद मानला गेला आणि काळ सोकावतो म्हटले गेले, ती आम्ही साहित्यिकांनीच खेळलेली राजकीय खेळी होती, हे आता स्पष्ट झाले आहे. उद्या शाळकरी पोरांचे देखील दबावगट तयार केले जातील. आपसातील गटबाज्या, लाथाळ्या आणि आत्यंतिक खालच्या थराला जाऊन जातीचे- धर्माचे- लिंगभेदाचे- विचारांचे राजकारण करणे हे संवेदनशील समजल्या जाणाऱ्या लेखक वर्गाकडून घडते आहे. जबाबदारीने लेखन न करणारे लेखक, पुस्तकांचे संपादन न करताच छापणारे प्रकाशक, निषेधासाठी (अध्यक्षपदाचा राजीनामा मागता येईल अशा) योग्य वेळेची वाट बघत थांबलेले विरोधक, आपल्या शब्दांची पाठराखण करू न शकणारे वयाचे व प्रकृतीचे बहाणे सांगत भेकड माघार घेणारे अध्यक्षपदी निवडून आलेले लेखक महोदय, त्यांची जागा घ्यायला आयत्या वेळीही बाशिंग बांधून तयार असलेले पडलेले उमेदवार लेखक, तांत्रिक मुद्यांवर घोळ घालत बसलेले महामंडळाचे पदाधिकारी.. हे सारेच या कचऱ्याला जबाबदार आहेत.&lt;br /&gt;संत साहित्याचे अभ्यासक म्हणवणाऱ्यांच्या या डावपेचांनी आणि महामंडळाच्या निष्क्रियपणातून अध्यक्षविना संमेलन झाले आणि ‘दादला नको गं बाई, मला नवरा नको गं बाई..’ असे भारूड गात संमेलनाला आत्यंतिक आध्यात्मिक दर्जा प्राप्त झाला.&lt;br /&gt;                      यानंतर साहित्यिकांच्या प्रतिक्रिया काय होत्या?&lt;br /&gt;उबग वाटणे, उद्विग्नता येणे, खेद व्यक्त करणे, दुर्लक्ष करणे, त्यातून अंग काढून घेणे, आपण त्या गावचेच नाही असे समजणे, चॅनेलवाल्यांनी वा पेपरवाल्यांनी विचारल्यानंतरच आपल्या किरकोळ प्रतिक्रिया व्यक्त करणे, या सर्व साहित्य व्यवहाराबाबत तुच्छता दाखवत उपरोधीने आपसात टवाळी करणे.. हे सारे वेगवेगळ्या गटातटांमधल्या वा एकएकटय़ा साहित्यिकांकडून यानंतर घडले. पण हे उत्तर असू शकत नाही.&lt;br /&gt;                      काय केले पाहिजे?&lt;br /&gt;                      ० ० ०&lt;br /&gt;महामंडळ बरखास्त करावे. साहित्य संस्थांची पुनर्रचना करावी. सलग तीन वर्षे संमेलन स्थगित ठेवून रसिक जाणकारांकडून संमेलनाच्या स्वरूपाविषयी सूचना मागवून त्यांचा नीट विचार, अभ्यास करून संमेलनांचे स्वरूप बदलावे. अध्यक्षाची निवडणूक होणार असेल, तर अध्यक्षपदासाठी एकही साहित्यिक अर्ज करणार नाही, अशी ठाम भूमिका साहित्यिकांनी घ्यावी.&lt;br /&gt;हे काही होत नाही तोवर आम्ही संमेलनांना जाणार नाही, असा बहिष्कार जबाबदारीने व गांभीर्याने लेखन करणाऱ्या साहित्यिकांनी घालावा. अशा ठिकाणी आम्ही पुस्तकांचे स्टॉल लावणार नाही, अशी स्पष्ट भूमिका सजग प्रकाशकांनी घ्यावी. रसिक, चोखंदळ वाचक, श्रोते आपल्याला निश्चितच पाठिंबा देतील, कारण या साऱ्या प्रकारांना तेही उबगले आहेत.&lt;br /&gt;                      तोवर इतकेच म्हणता येईल की, झाले ते चांगलेच झाले.&lt;br /&gt;आमची खरोखरच पुरेपूर मुस्कटदाबी होऊ द्या. जाती- धर्म- प्रांत- भाषा- व्यवसाय अशा वेगवेगळ्या गटातटांमधल्या लोकांच्या सेन्सॉरशिप आमच्यावर लादल्या जाऊ द्या. आम्हाला काही फरक पडणार नाही. कारण आम्ही लाचारांच्या फौजा आहोत.. ज्या फौजेतला प्रत्येकजण एकाकी आहे..!&lt;br /&gt;संवादहीनता किंवा विसंवाद हेच आम्हाला प्रिय आहेत. सुपाएवढे काम करून लोक आमची तथाकथित निर्भीड आणि विचारगर्भ इत्यादी भाषणे ऐकतात. खेडय़ापाडय़ांतून धडपडून येऊन पैसे मोजून आमची पुस्तके विकत घेऊन वाचतात आणि मागाहून ते शब्द पाखडतात तेव्हा फक्त फोलपटेच वाऱ्यावर उडत राहतात.. कचरा वाढत जातो..&lt;br /&gt;वॉल-ई या चित्रपटातले एक दृश्य मला आठवते- इमारतींच्या उंचीहून कचऱ्याचे ढीग अधिक उंच बनले आहेत आणि त्यातून एक यंत्रमानव&lt;br /&gt;                      खांद्यावर बसलेल्या झुरळाशी बोलत चालतो&lt;br /&gt;                      आहे..!&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6384334779849098020-6124802253517711229?l=bhinn.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://bhinn.blogspot.com/feeds/6124802253517711229/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://bhinn.blogspot.com/2010/02/blog-post.html#comment-form' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6384334779849098020/posts/default/6124802253517711229'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6384334779849098020/posts/default/6124802253517711229'/><link rel='alternate' type='text/html' href='http://bhinn.blogspot.com/2010/02/blog-post.html' title='आम्ही लाचारांच्या फौजा'/><author><name>kavita mahajan</name><uri>http://www.blogger.com/profile/16591743012412093153</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='21' src='http://1.bp.blogspot.com/_VOqp55NrS1U/SxAfP-tj-JI/AAAAAAAAAAw/1Ul3tR5jyzM/S220/kavita+Mahajan.JPG'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6384334779849098020.post-5778683797879678013</id><published>2009-03-26T09:35:00.000-07:00</published><updated>2011-12-18T08:43:40.456-08:00</updated><title type='text'>विचारांची पद्धत</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;विचारांची पद्धत बदलली की आपले अर्धे प्रश्न सुटतात, हे मला नुकतेच एक मित्रासोबत बोलताना लक्षात आले... मधील दोन वर्षे मी लेखन थांबविले होते, ते त्यानंतर पुन्हा आता सुरू केले... &lt;br /&gt;&lt;span class=""&gt;या काळात खूप चर्चा झाली... हा रायटर्स &lt;span class=""&gt;block &lt;/span&gt;नव्हता...&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;मी ठरवून लेखन थांबविले होते... &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;आता पुन्हा सुरुवात करते आहे नव्यानं...&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6384334779849098020-5778683797879678013?l=bhinn.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://bhinn.blogspot.com/feeds/5778683797879678013/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://bhinn.blogspot.com/2009/03/blog-post.html#comment-form' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6384334779849098020/posts/default/5778683797879678013'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6384334779849098020/posts/default/5778683797879678013'/><link rel='alternate' type='text/html' href='http://bhinn.blogspot.com/2009/03/blog-post.html' title='विचारांची पद्धत'/><author><name>kavita mahajan</name><uri>http://www.blogger.com/profile/16591743012412093153</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='21' src='http://1.bp.blogspot.com/_VOqp55NrS1U/SxAfP-tj-JI/AAAAAAAAAAw/1Ul3tR5jyzM/S220/kavita+Mahajan.JPG'/></author><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6384334779849098020.post-5153592190204985712</id><published>2009-03-23T04:33:00.000-07:00</published><updated>2009-03-23T04:41:05.697-07:00</updated><title type='text'>Suruvat</title><content type='html'>नमस्कार&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;मनाला वाटते ते आणि वाट्टेल ते सारे सांगता यावे, अशी एखादी जागा असावी, म्हणून हा ब्लॉग।&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;नेहमीचे सारे तर असतेच, पण भिन्न विचार, मोकळी मते मांडावी, अशी ही जागा...&lt;/span&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6384334779849098020-5153592190204985712?l=bhinn.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://bhinn.blogspot.com/feeds/5153592190204985712/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://bhinn.blogspot.com/2009/03/suruvat.html#comment-form' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6384334779849098020/posts/default/5153592190204985712'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6384334779849098020/posts/default/5153592190204985712'/><link rel='alternate' type='text/html' href='http://bhinn.blogspot.com/2009/03/suruvat.html' title='Suruvat'/><author><name>kavita mahajan</name><uri>http://www.blogger.com/profile/16591743012412093153</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='21' src='http://1.bp.blogspot.com/_VOqp55NrS1U/SxAfP-tj-JI/AAAAAAAAAAw/1Ul3tR5jyzM/S220/kavita+Mahajan.JPG'/></author><thr:total>2</thr:total></entry></feed>
